Breaking : bolt
बनावट औषध पुरवठा प्रकरण बाहेर येऊ नये म्हणूनचंं तर झाले नसेल औषध निर्माण अधिकाऱ्याचंं निलंबन ?गणपती व आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील मानव गवंडी टोळी हद्दपारसंजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील सागर लोखंडे टोळी हद्दपार; सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात २ वर्षे प्रतिबंधितमुल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने दाम्पत्याची फसवणूक, दागिने चोरी करणारा संशयित जेरबंदराष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपकोट्यवधींचा औषध खरेदी घोटाळा उजेडात, कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांची "आरोग्य भवन" वारी ?ठाकरे "ब्रँँड" ला धक्का पोहोचवणारा निकाल, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांचा ठाकरे बंधूंना टोमणा !केंद्र सरकारची मुख्य निवडणूक आयुक्तांमुळे कोंडी होण्याची शक्यता, २४ तासात महाभियोग आणण्याची तयारी.....स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून कोकणात महायुतीतील बडे नेते राणे - सामंत यांच्यात तणाव.....?मागायला गेला "दाद" घातली कंबरेत "लाथ", लोकशाहीच्या आत्म्यावरचा प्रहार......

जाहिरात

 

लातूर जिल्ह्यात येणार २ हजार २६८ कोटींची गुंतवणूक

schedule13 Apr 25 person by visibility 277 categoryलातूर

सचिन तळेकर (लातूर) - जिल्ह्यातील गुंतवणूक वाढावी, उद्योगांना चालना मिळावी आणि त्यामधून रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी गुंतवणूकदारांना विविध सोयी-सुविधा कालबद्ध स्वरुपात देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने सातत्याने पुढाकार घेत उद्योजकांना बोलावून त्यांच्या समस्या जाणून घेवून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही जिल्ह्यात येणाऱ्या गुंतवणूकदारांना पाठबळ दिले जाईल, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

                 जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढीसाठी हॉटेल ग्रँड सरोवर येथे आयोजित लातूर जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. यावेळी ‘मैत्री’ संस्थेचे सागर आवटी, आकाश ढगे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनमोल कोरे, व्यवस्थापक प्रवीण खडके, गोपाल पवार, बबन कांबळे, टपाल विभागाचे मोहन सोनटक्के, भारतीय स्टेट बँकेचे बालाजी गोपाल एमसीईडीचे प्रादेशिक अधिकारी सुदाम थोटे, दीपक जोशी यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक उपस्थित होते.

                 जिल्ह्यात गुंतवणूक वाढीसाठी जिल्हा उद्योग केंद्र आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न होत आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सारख्या उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये गेल्या तीन वर्षात लातूर जिल्हा सातत्याने राज्यात अग्रेसर आहे. उद्योग क्षेत्राला चालना देणारा जिल्हा अशी लातूरची ओळख निर्माण व्हावी, यासाठी प्रशासकीय पातळीवरून सातत्याने पुढाकार घेतला जात आहे. गेल्या दोन महिन्यात तीन वेळा उद्योजकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणे, त्या सोडविणे यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विशेष बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यासोबतच उद्योजकांना आवश्यक विविध परवानग्या गतीने आणि कमीत कमी वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाल्या.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes